रत्नागिरी : तालुका भंडारी समाजातर्फे २०१८मध्ये दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ १५ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता शहरातील भैरव मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, ‘झी’ वाहिनीचे बिझनेस हेड व काळबादेवी गावचे सुपुत्र नीलेश मयेकर, रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे अध्यक्ष राजीव कीर, रत्नागिरी जिल्हा भंडारी समाज संघाचे अध्यक्ष शरद बोरकर, जेष्ठ शिक्षण महर्षी म. ना. वांदरकर गुरुजी, रत्नागिरी पंचायत समिती सभापती विभांजली पाटील, रत्नागिरीचे डीवायएसपी गणेश इंगळे, जेष्ठ इतिहास संशोधक श्रीकांत शेट्ये, राजापूर तालुका भंडारी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, संगमेश्वर तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष संतोष सुर्वे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तालुक्यातील सर्व ज्ञाती बांधवांनी आणि उत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींनी आपल्या पालकांसह कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी तालुका भंडारी समाजातर्फे करण्यात आले आहे.
दिवस : रविवार, १५ जुलै २०१८
वेळ : दुपारी ३.३० वाजता
स्थळ : भैरव मंगल कार्यालय, भैरी मंदिरा शेजारी, खालची आळी, रत्नागिरी.